गुरुवार, ५ मार्च, २००९

सावध रे...!

धावपळीच्या काळात लोक अनेकदा बेसावधपणे वागतात. त्याचाच फायदा गुन्हेगार उठवीत असतात. आपल्या आजूबाजूला बेमालूमपणे चोर वावरत असतात. गुन्हा घडल्यावर पोलिसांत तक्रार करून उपयोग होतोच असे नाही. त्यामुळे आपणच थोडीशी सावधगिरी बाळगली, तर फसले जाण्याचे प्रकार टाळता येऊ शकतात. आपली सुरक्षा आपणच घ्यावी, हाच यामागील संदेश. चला! एकमेकांना सावध करू या. त्यासाठी या काही "टिप्स'....
घराबाहेर पडताना...
- घराचे कुलूप दणकट असल्याची खात्री करावी.
- जास्त काळ बाहेर जायचे असल्यास शेजाऱ्यांना व जवळच्या पोलिस ठाण्यात त्याची माहिती द्यावी.
- बाहेरगावी कोठे जाणार, तेथील संपर्काचा क्रमांक द्यावा.
- दागिने अगर इतर मौल्यवान वस्तू बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात.
- रात्री घरातील एखादा तरी दिवा सुरू राहील अशी व्यवस्था असावी.

प्रवास करताना....
- बसमध्ये बॅगा व्यवस्थित "लॉक' करून ठेवाव्यात.ै
- मौल्यवान वस्तू असलेल्या बॅगा शक्‍यतो जवळच ठेवाव्यात.
- अनोळखी व्यक्तींनी दिलेले खाद्यपदार्थ स्वीकारू नयेत.
- जादा सलगी करू पाहणाऱ्या सहप्रवाशापासून सावध राहावे.
- गर्दीत बसमध्ये चढताना आणि उतरताना खिसेकापूपांसून सावध.
- अपरिचित भागातून रात्रीचा प्रवास टाळावा.
- अनोळखी व्यक्तींना "लिफ्ट' देऊ नये.
- रस्त्यात कोणी विनाकारण थांबवत असेल तर, थांबणे टाळावे.

सदासर्वदा सावधान...
- गुन्ह्याला सामोरे जावे लागल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.
- चोरट्याचे वर्णन, भाषाशैली, लकब आदी तपशील लक्षात ठेवावा.
- अनोळखी व्यक्तीशी बोलताना त्याचे वर्णन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा.
- अंगावर घाण टाकूण किंवा पैसे पडल्याचे सांगून कोणी लक्ष विचलित करीत असेल तर, जवळचा ऐवज पहिल्यांदा सांभाळा.
- अंगावरील दागिन्यांचे प्रदर्शन टाळावे.
- विनाकारण कोणी ओळख काढून संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्या व्यक्तीला दूर ठेवा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: