शनिवार, १६ ऑक्टोबर, २०१०

गुन्हेगारांचेही सिमोल्लंघन

दिवसें दिवस गुन्हेगारीच स्वरुप बदलत आहे. गुन्हेगारही बदलत आहेत. बदलत्या तंत्रज्ञानाचा गुन्हेगारीसाठी वापर केला जाऊ लागला आहे. एका बाजूला पोलिस यंत्रणा बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना गुन्हेगारी क्षेत्रही आणखी विस्तारत आहे. पूर्वीच्या गुन्ह्यांच्या पद्धती आणि आताच्या पद्धती पाहिल्या तर गुन्हेगारीनेही सिमोल्लंघन केल्याचे दिसून येते.

पूर्वी ग्रामाणी भागात शेतावर चोऱ्या व्हायच्या. काढणीला आलेले पीक कापून नेणे, शेतावर पडलेली इतर अवजारे चोरून नेणे, जनावरे चोरणे असे प्रकार घडत. गावात चोऱ्या झाल्या तरी धान्य, कपडेलत्ते, भांडीकुडी चोरी जात होती. तेव्हा रोख पैसा आणि दागिने फारसे नव्हते. त्यामुळे चोरट्यांना अशा अवजड वस्तूंचीच चोरी करावी लागत होती. शिवाय चोरटे पायी, रानावनातून पळून जायचे. आता मात्र शेतावरच्या चोऱ्या जवळपास बंद झाल्या आहेत. अवजड वस्तूंच्या चोऱ्या करण्याच्या भानगडीत चोरटे पडत नाहीत. प्रवासासाठी वाहने वारतात, संपर्कासाठी मोबाईलसारखी साधने वापरतात, अवजड वस्तू चोरण्यापेक्षा पैसे, दागिने, महागडी साधने अशा वस्तू चोरी जातात.

पूर्वी विशिष्ट जाती जमातीचे लोकच चोऱ्या-माऱ्या करीत होते. आता त्यांचीही संख्या वाढत आहे. कष्ट घेऊन करायच्या चोऱ्यांपेक्षा आता कमी श्रमात पैसे मिळवायचे "धंदे' ही सुरू झाले आहेत. अपहार, फसवणूक, गैरव्यवहार असे गुन्हेही आता होऊ लागले आहेत. नव्या तंत्रांचा जसा विकास होत आहे, तसे बसल्या जागी चोऱ्या करण्याचे तंत्रही चोरटे शोधून काढीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: