रविवार, ५ फेब्रुवारी, २०१२

पाकिस्तानमध्ये अडकलेल्या एका भारतीयाची व्यथा...

रेल्वेगाडी बदलताना ते चुकून पाकिस्तानमध्ये जाणाऱया गाडीत बसले. पाकिस्तानात गेल्यावर बेकायदा प्रवेश केला म्हणून त्यांना अटक झाली. न्यायालयाने नंतर त्यांच्या सुटकेचा आदेश दिला. मात्र, योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने ते अद्याप पाकिस्तानात अडकून पडले आहेत.

आता त्यांच्या सुटकेसाठी पुण्यातील सरहद संस्थेने प्रयत्न सुरू केले आहेत.
इकडे कराळे यांचे कुटुंबीय त्यांची वाट पाहत आहेत. त्यांच्या सुटकेसाठी त्यांनी स्थानिक खासदारांमार्फत प्रयत्न केले, मात्र त्याला अद्याप यश आलेले नाही. आता सरहद संस्थेच्या प्रयत्नांकडेच त्यांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: